google.com, pub-7118703508047978, DIRECT, f08c47fec0942fa0
महाराष्ट्र

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीचे सर्व्हे योग्य करा

भारतीय ऑल मीडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडियाची मागणी

प्रतिनिधी अकोला : जुन ते सप्टेंबर या महिन्यांच्या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक भागात शेतकऱ्यांच्या शेतीचे प्रचंड नुकसान झाले. नुकसान भरपाई देण्यासाठी शासनाच्या कर्मचाऱ्यांकडुन पंचनामे करण्यात येत आहेत मात्र काही गावांमध्ये नुकसानग्रस्त भागाचे सर्व्हे योग्य रितीने करण्यात येत नसल्याची बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे योग्य रितीने करण्याची मागणी भारतीय आॅल मिडीया सुरक्षा फोरमचे जिल्हाध्यक्ष आकाश जंजाळ यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना अतिवृष्टीची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. राज्यात जून ते सप्टेंबर कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती, त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्याच अनुषंगाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वितरीत करण्यासाठी पंचनामे करण्यात येत आहेत मात्र अकोला जिल्ह्यातील काही गावांमध्ये बऱ्याच नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्यात आले नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतीचे योग्य रितीने पंचनामे करण्यात यावे अन्यथा शेतकऱ्यांसमवेत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भारतीय आॅल मिडीया सुरक्षा फोरमचे अकोला जिल्हाध्यक्ष आकाश जंजाळ यांनीअतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीचे सर्व्हे योग्य करा

– भारतीय ऑल मीडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडियाची मागणी

प्रतिनिधी
अकोला : जुन ते सप्टेंबर या महिन्यांच्या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक भागात शेतकऱ्यांच्या शेतीचे प्रचंड नुकसान झाले. नुकसान भरपाई देण्यासाठी शासनाच्या कर्मचाऱ्यांकडुन पंचनामे करण्यात येत आहेत मात्र काही गावांमध्ये नुकसानग्रस्त भागाचे सर्व्हे योग्य रितीने करण्यात येत नसल्याची बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे योग्य रितीने करण्याची मागणी भारतीय आॅल मिडीया सुरक्षा फोरमचे जिल्हाध्यक्ष आकाश जंजाळ यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना अतिवृष्टीची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. राज्यात जून ते सप्टेंबर कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती, त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्याच अनुषंगाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वितरीत करण्यासाठी पंचनामे करण्यात येत आहेत मात्र अकोला जिल्ह्यातील काही गावांमध्ये बऱ्याच नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्यात आले नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतीचे योग्य रितीने पंचनामे करण्यात यावे अन्यथा शेतकऱ्यांसमवेत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भारतीय आॅल मिडीया सुरक्षा फोरमचे अकोला जिल्हाध्यक्ष आकाश जंजाळ यांनी ,राष्ट्रीय अध्यक्ष अय्युब भाई कच्छी यांचा आदेश अनुसार ,,व प्रदेशाध्यक्ष रफिक शेरखान, यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button